अंदाजे १९१५ पासून, दुधगांवकर कुटुंबाने पंढरपूरच्या आषाढी वारीत माऊलींच्या पादुका अभिषेकाचा मान सांभाळून, रझाकारांच्या जुलमाविरुद्ध गावांचे रक्षण करून जनतेचा विश्वास मिळवला आहे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री श्री. गणेशराव दुधगावकर यांनी विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनवून लोकनेता म्हणून नावलौकिक कमावला, बजाज वाळूज येथे आणण्यात प्रमुख भूमिका निभावली, सत्कार्याने महाराष्ट्राचे राजकारण गाजविले. निर्व्यसनी, श्रीमदभगवदगीता अभ्यासक समीर दुधगावकर हे अमेरिकेतून पदव्युत्तर आहेत आणि पुढील पिढीतील जनसेवक आहेत. समीर हे मागेल त्याला सौर कृषिपंप योजना मंजुरीतील नाव असल्याने लाखो शेतकरी आणि तरुणांना सक्षम करत, नाविन्यपूर्ण कल्पनांमधून कोट्यवधींचा आर्थिक लाभ देत मूल्याधारित परिवर्तन घडवत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी स्थित परभणी जिल्ह्याबाबत प्रचलित जगात जर्मनी भारतात परभणी या म्हणीला सकारात्मक अर्थ देण्यात या परिवाराचे योगदान आहे.