समीर यांचे गावपातळीवरील कार्य
व्यसनमुक्त योद्धा समीर दुधगांवकर :
अध्यात्मिक, दूरदर्शी नेतृत्व..!!
समीरचे गावपातळीवरील कार्य ( प्रमुख उपक्रम )
समीर यांनी परभणीमध्ये अनेक परिवर्तनशील पायाभूत उपक्रम राबवले आहेत, ज्यात शेती, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि समुदाय सक्षमीकरण यांचा समावेश आहे, ज्यामुळे लक्षणीय आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडले आहेत. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित दैनिक सकाळने त्यांना २०१९ मध्ये “परभणी युथ आयकॉन” म्हणून संबोधले होते आणि लोकमत समूहाने त्यांना “महाराष्ट्र रत्न” प्रेरणादायी नेतृत्व म्हणून जून २०२५ मध्ये निवडले होते.




समीर यांची वैचारिक संवेदनशीलता दाखवणारे प्रसंग - स्वार्थ नाहीच, फक्त परमार्थ...!
1. मराठा आरक्षण आंदोलन: मराठा समाजाच्या हक्कांसाठी समीर दुधगांवकर यांनी स्वतःचे कार्यालय परभणी जिल्ह्याच्या जनतेसाठी समर्पित केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे आत्महत्या केलेल्या सहा कुटुंबांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांनी सहानुभूती आणि समर्थनाचा हात पुढे केला. तसेच, आझाद मैदानाकडे जाणाऱ्या काही गावांतील युवकांना किराणा साहित्य पुरवून आंदोलनाला बळ दिले.
आरक्षणासाठी मंत्र्यांच्या मुलानेही पक्ष सोडला ;
थेट मोदी – फडणवीसांनाच भिडले |
a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: या अभियानाने ८ गावांमध्ये (प्रति गाव सरासरी ५००-७०० घरे) शेकडो माकडांचे स्थलांतर करून दरवर्षी प्रति नागरिक २०,४०० ते १,२६,२५० रुपयांची बचत सुनिश्चित केली. यात छतांची बचत, पीक बचत आणि नागरिकांचे जखमांपासून बचत यांचा समावेश आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावले आणि शेती क्षेत्राला संरक्षण मिळाले.


गावपातळीवरील जीवनमान उंचावण्यासाठीचे समीर यांचे खालील प्रकल्प आहेत.
संस्कृती रक्षण, पर्यावरण -
1. धारासूर, ता. गंगाखेड: गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समीर दुधगांवकर यांनी मा. पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची भेट घेतली. गावकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेताना, वर्षभरात निर्णय घडवून आणण्याचा शब्द दिला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून, २०२२ च्या अखेरीस मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यामार्फत २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, ज्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळाली.








a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: सांस्कृतिक अभिमान वाढवणे, स्थानिक पर्यटनात २० – ३०% वाढ, आणि १०००+ रहिवाशांसाठी १०-१५% अधिक व्यापार निर्मिती शक्यता..
2. अतिरिक्त होर्डिंग वापर कमी करण्यासाठी अग्रदूत (प्रस्तावित धोरण): समीर दुधगांवकर यांनी ३ ऑगस्ट २०२३ पासून शहर विद्रूप करणारी, पर्यावरणाला हानिकारक आणि अतिशयोक्तीपूर्ण बॅनरबाजी वरील खर्च कमी करून त्या निधीचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्याची दिशादर्शक मोहीम सुरू केली.
- परभणी येथे सुरू झालेल्या या मोहिमेची सर्व स्तरांवर प्रशंसा झाली असून, नवीन पिढी दिखाव्यापासून दूर राहत आहे. ऑगस्ट २०२३ पासून होर्डिंगचा वापर कमी करून आणि त्यासाठीचा निधी गरजूंना वळवण्याच्या प्रस्तावाने, विशेषतः घाटकोपर होर्डिंग अपघातानंतर जोखमींवर प्रकाश टाकला.
- ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: राष्ट्रीय स्तरावर जर हे धोरण केले गेले तर या मोहिमेमुळे दरवर्षी ११,८५९ ते १९,८१८ कोटी रुपयांची बचत, ४,५०,००० टन कचऱ्याची कपात आणि संभाव्य मृत्यू टाळण्याची शक्यता आहे, तसेच जनतेचा विश्वास संपादन करत सामाजिक कार्य करावे या आणि पर्यावरणीय विचारांना चालना मिळेल.
a) या प्रकल्पाने सामाजिक एकता आणि परस्पर सहकार्याला चालना दिली आहे, ज्यामुळे परभणी आणि आसपासच्या भागात समुदायांमधील सौहार्द लवकरच वाढलेले दिसेल आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन मिळेल.
a) पहिल्या वर्षाचा विषय माजी मंत्री खासदार अँड. गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही राऊत) यांच्या नैतिक आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित तर दुसऱ्या वर्षासाठी श्रीमद् भगवद गीतेच्या एक श्लोकी गीता म्हणाल्या जाणाऱ्या १८:६६ या श्लोकाचा नेमका अर्थ काय हा विषय होता. “महिलांचे त्यांच्याच मुलाच्या विरोधात असणाऱ्या पुरुष-विरोधी कायद्यांबाबत मौन धारण करणे – योग्य की अयोग्य” हा तिसऱ्या वर्षी विषय आहे.
a) हजारो लोकांसमोर, अनेक गावांमध्ये श्रीमद् भगवद् गीतेच्या अभ्यासावर प्रवचने देऊन नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले, ज्यामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळाली आहे.
शेतकरी उत्पन्न वाढ, सिंचन, संरक्षण:-
2. जिल्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा चळवळीत समीर यांचे सक्रीय नेतृत्व – २०२२ मध्ये ५२ मंडळांसाठी शेतकऱ्यांना ₹ ४१० कोटी मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केले. राजकीय आयुष्यातील अनेक वर्ष चाललेली हि एकमेव केस, ज्यातून २०२५ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली… (सध्यापर्यंत तरी एकच केस आहे…! 😉)
a) जिंतूर मधील दुधगांव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप, रबी हंगामातील पीक विम्यासाठी आंदोलने केली. ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किर्तन आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात पंचक्रोशीतील हजारो शेतकरी सहभागी. सोयाबीनचा थकलेला विमा मिळाला, काही दिवसांनी हरभऱ्याचाही विमा मिळाला.
a. जरांगे पाटलांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनात समीर त्यांनी परभणी जिल्ह्यात सक्रिय नेतृत्व केले. उद्योजक तसेच मराठा आंदोलक नेतृत्व म्हणून या योजना मंजुरीमागील युवा नेते म्हणून समीर दुधगांवकर यांनी इतिहासात स्थान मिळविले.
c. ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५,९११ पंप वाटल्यामुळे गिनीज बूक मध्ये महाराष्ट्राचे नाव नोंदविले गेले आहे.
- ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: प्रत्येक पंपामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ५,००० ते १०,००० रुपये बचत होणार, ४५ लाखांहून अधिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रति पंप ०.५ टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. सौर पंपांमुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात थांबण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो. ज्याने शाश्वत शेतीला चालना मिळाली आहे.
- अमूर्त लाभ: या योजनेमुळे दरवर्षी ५० ते २०० जीव वाचवले जातात, लाखो शेतकरी परिवारांचा, गड्यांचा झोपेचा दर्जा सुधारतो आणि ३,५२५ ते १०,६०० कोटी रुपये वार्षिक सामाजिक लाभ मिळतो.
- योजनेचे ३.५ ते ९.३:१ लाभ-खर्च गुणोत्तर शाश्वत शेतीसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाला चालना मिळाली आहे.



4. ४३ गाव समृद्धी समिती – ७० वर्षे जुना पाणी प्रश्न :- जून २००९ मध्ये मा. आमदार सुरेश वरपूडकरांनी, मंत्री अजित पवारांची मीटिंग घेवून प्रश्न सोडवण्याचे केवळ नाटक केल्याने प्रलंबितच राहिला होता. २०१८ मध्ये गावकऱ्यांच्या आग्रहास्तव या प्रश्नाच्या गांभीर्याला लक्षात घेऊन समीर यांनी परभणी, मानवत आणि पाथरी येथील “४३ गाव पाणी प्रश्न समिती” बनवून आंदोलन उभे केले, सगळ्या गावात मीटिंग घेतल्या. राज्य सरकारच्या मराठवाडा वॉटर ग्रिड मंजुरीमुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल या माहितीनंतर आंदोलनाची गरज उरली नव्हती.
a) पुढे, या गावांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचे रूपांतर “४३ गाव समृद्धी समिती”मध्ये झाले.
b) आमदार विटेकर यांनी हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये ही मागणी पुन्हा उपस्थित केली. आमदार विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्वेक्षणाचे जुलै २०२५ मध्ये आदेश.
5. मुळी बंधारा पुनर्रुजीवन, ता. गंगाखेड:
a) सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यातील २० ते २५ गावांना या बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ होतो. बंधाऱ्याचे वाहून गेलेले दरवाजे पुन्हा बसवावेत, अशी मागणी चार वर्षांपासून दुर्लक्षित होती. ऑगस्ट २०२० मध्ये या प्रश्नाचा पाठपुरावा केला, दरवाजे बसवण्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू होणार होती. कार्य पूर्ण झाले आहे असे संबंधित अधिकारी यांनी कळविले आहे.
उद्योजकता तसेच युवकांचे भविष्य निर्माण
1. सहकारी बँकांसाठी CGTMSE मध्ये समावेश: समीर दुधगांवकर यांच्या भाजपा उद्योग आघाडीच्या कार्यकाळा दरम्यान सहकारी बँकांना क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) मध्ये सामील होण्यासाठी आणि बिनतारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला गेला.
a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: यामुळे १०,००० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) १०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज सुलभ झाले, ज्यामुळे जीडीपीमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.
b) दीर्घकालीन परिणाम: या समर्थनामुळे दरवर्षी ७५,००० ते २,००,००० तरुण आणि उद्योजकांना लाभ होऊ शकतो, यापैकी ५२,५०० ते १,६०,००० टियर-२ आणि त्यापेक्षा खालच्या शहरांतील व्यक्तींसाठी, १७,५०० कोटी ते ५२,५०० कोटी रुपयांच्या बिनतारण कर्जाद्वारे लाभ होणे अपेक्षित आहे. यामुळे १,०५,००० ते ८,००,००० रोजगार निर्माण होतील, त्यापैकी ५२,५०० ते ४,००,००० तरुणांसाठी असेल, परभणीसारख्या उपेक्षित क्षेत्रांमध्ये ६१,२५० कोटी ते १,८३,७५० कोटी रुपयांची जीडीपी वाढ होते. हे प्रयत्न स्वावलंबन आणि आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनाशी संरेखित असून, ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरत आहेत.
a) वर्ल्ड बँक प्रकल्पांतर्गत संभाजीनगर, जालना तसेच देशभरातील विविध ठिकाणी दरवर्षी हजारो युवकांना नोकऱ्या लावण्याचे कार्य सुरू आहे.
3. बजेट आणि तरुणांच्या रोजगारावरील टीव्ही चर्चा (२०१५ पासून): २०१५ पासून बजेट आणि तरुणांच्या समस्यांवर विविध टीव्ही चर्चासत्रांमध्ये पॅनेलिस्ट म्हणून समीर यांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यात तरुणांच्या रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि आर्थिक धोरणांवर वैचारिक योगदान दिले.



b) हमाल पोस्ट ग्रड्यूएट – झी टीव्ही रोखठोक चर्चा कार्यक्रमातील सहभागाची लिंक
4. नोकऱ्या दुप्पट करणे आणि सामाजिक प्रभाव: “नोकरी नाही तर छोकरी नाही” ही प्रचलित म्हण लक्षात घेता, समीर दुधगांवकर यांनी ऑक्टोबर २०१७ पासून “नोकऱ्या दुप्पट करणे” ही क्रांतिकारी संकल्पना मांडली, ज्यामुळे २ करोड सरकारी आणि १० करोड खासगी क्षेत्रातील नोकऱ्या दुप्पट होऊ शकतात. विशेषतः सरकारी नोकऱ्यांमुळे विवाह बाजारात व्यक्तींची मागणी वाढते, कारण अशा नोकऱ्यांना स्थैर्य आणि प्रतिष्ठा आहे. जरी पर्याय दिला तरी या योजनेमुळे १ कोटी नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे योजना घोषित केल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात लाखो/करोडो तरुणांचे विवाह होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुखाकारकता वाढेल.
a) प्रस्तावित धोरण: सध्या कर्मचारी ९ तास काम करतात, परंतु तज्ञांच्या मते, अनेक कर्मचारी केवळ ५ तास प्रभावीपणे कार्य करतात. म्हणून, ५ तासांची ड्युटी अनिवार्य करून दुसऱ्या व्यक्तीला नोकरीची संधी देण्यासाठी असा कायदा बदल केला पाहिजे. यामुळे एकूण १० तासांचे कार्य अखंडित राहील, देशाच्या उत्पादकतेला चालना मिळेल आणि करोडो नवीन नोकऱ्या तात्काळ निर्माण होतील.
“जरी पर्याय दिला तरी या योजनेमुळे १ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात” हे मंत्री संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर संघटनेतर्फे हि मागणी मांडताना महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष –
एका शिफ्टमध्ये दोघांना रोजगार देता येईल असा कायदा बदल करा – महाराष्ट्र चेंबर अध्यक्षांची संघटनेतर्फे मागणी..!
b) उल्लेखनीय म्हणजे, उद्योग दिग्गजांसोबत कार्य करताना समीर यांनी पारंपरिक नऊ तासांच्या कामाच्या दिवसातील अकार्यक्षमतेची गोम शोधली — ही एक महत्त्वपूर्ण बाब जी अगदी अनुभवी उद्योग नेत्यांनाही दिसली नाही ती समीर यांना दिसली आणि यांच्या वैचारिक ताकत दर्शविते.


या शासकीय पत्राद्वारे आणि समीर यांनी संकलित केलेल्या लिंकन यांच्या मार्गदर्शक विचारांतून लक्षात येते की पूर्णपणे समीरचे वैचारिक नेतृत्व लाभलेल्या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकता बदलासाठी उपयोग होतोय.
म्हणजेच नौकऱ्या दुप्पट करणे प्रकल्पाचा सुद्धा टीम समीरने सांगितलेला फायदा नक्कीच होऊ शकतो.


नागरिकांना प्रबळ आवाहन पृष्ठावर केलेल्या विनंतीवजा विचारांप्रमाणे जर साथ द्यायची तयारी असेल तसेच साथीदार कसे असावे हे संपर्क पृष्ठावर हिंदुस्तानचा वारसा जपण्याच्या संधीबाबत या पृष्ठावर मांडले आहे. या विचारांना धरून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या अभ्यासावर आधारित कर्जबाजारीपणा टाळत ज्या संकल्पनांवर कार्य होईल, अश्या मराठवाड्याचे कर्मवीर गणेशराव दुधगावकर परिवाराच्या संकल्पना –
अमेरिकेकडे दर एक दोन वर्षाला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतात, तसेच जगातील लोकशाहीने चालणाऱ्या सगळ्याच देशांच्या कर्जबाजारीपणातून झालेली पोलखोल पाहता खालील संकल्पना सुचविणारे एक प्रखर निर्लोभी नेतृत्व टीम समीर यांच्या मागे सगळे जण उभे राहतील हि आम्हाला खात्री आहे.
- जीवघेणी/घातक/गळेकापू स्पर्धा १००% कमी करण्यासाठी आमदार-खासदार-मंत्री पदांकरिता टर्म लिमिट कायदे. एका सभागृहात फक्त दोनच टर्म (दहा वर्षे) करण्याची मुभा देणारा कायदा. मंत्रिपद एकदाच (फक्त पाच वर्षे) असा कायदा
- नौकऱ्या दुप्पट करण्याचा प्रकल्प (यातून भ्रष्टाचार ५०% कमी होण्याची दाट शक्यता)
- “22 MH 01 SAMIR” “01 MH 01 EKNATH” अश्या vanity नंबरप्लेट देण्याचा कायदा बनवून देशाला दरवर्षी हजारो करोड महसूल जमा करण्याची योजना
- देशव्यापी दारू-तंबाखू-गुटखा-पान मसाला बंदी कायदा असावा किंवा कुठेच नसावा
- न्यायप्रणालीत सुधारणेसाठी अपेक्षित ती गुंतवणूक सरकारने पहिल्या दिवशी करणे (आणि सगळे पीक विमा खाणारे, लुटारू, मोकार, बदनाम नेते पहिल्या काही वर्षातच तुरुंगात पाठवणे)
- सरकारच्या जाहिरातबाजी, नेत्यांच्या बॅनरबाजी विरोधात कडक कायदे असावे
दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व समीर यांचे बाबत :-
समीर दुधगांवकर – संक्षिप्त माहिती
समीर यांचा विस्तृत प्रवास
राज्य, राष्ट्रीय पातळीवरील कार्य
समीर यांचे विशेष अभ्यास क्षेत्र, आवडी, महत्वाच्या प्रकल्प संकल्पना