समीर यांचे गावपातळीवरील कार्य

व्यसनमुक्त योद्धा समीर दुधगांवकर :
अध्यात्मिक, दूरदर्शी नेतृत्व..!!

समीरचे गावपातळीवरील कार्य ( प्रमुख उपक्रम )

समीर यांनी परभणीमध्ये अनेक परिवर्तनशील पायाभूत उपक्रम राबवले आहेत, ज्यात शेती, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि समुदाय सक्षमीकरण यांचा समावेश आहे, ज्यामुळे लक्षणीय आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडले आहेत. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित दैनिक सकाळने त्यांना २०१९ मध्ये “परभणी युथ आयकॉन” म्हणून संबोधले होते आणि लोकमत समूहाने त्यांना “महाराष्ट्र रत्न” प्रेरणादायी नेतृत्व म्हणून जून २०२५ मध्ये निवडले होते.

मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश चांगल्या शैक्षणिक संस्थांसोबत काम करून तरुणांना रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रणाली उभी करणे, शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी, कल्याणासाठी तसेच परिसरातील उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणे, भारत सरकारला नवीन शैक्षणिक धोरण (NEP), कामगार कायदे आणि त्यातून नौकऱ्या दुप्पट करणे संकल्पना, समान नागरी संहिता तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप योजना अशी अनेक धोरणं सुचविणाऱ्या (किंवा सरकारने अभिप्राय मागितल्यावर त्यासाठी नेतृत्व करणाऱ्या) उद्योजक टीमचा भाग असणे – यातून समीर सर्वांसाठी समृद्धी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहतात.

समीर यांची वैचारिक संवेदनशीलता दाखवणारे प्रसंग - स्वार्थ नाहीच, फक्त परमार्थ...!

1. मराठा आरक्षण आंदोलन: मराठा समाजाच्या हक्कांसाठी समीर दुधगांवकर यांनी स्वतःचे कार्यालय परभणी जिल्ह्याच्या जनतेसाठी समर्पित केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे आत्महत्या केलेल्या सहा कुटुंबांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांनी सहानुभूती आणि समर्थनाचा हात पुढे केला. तसेच, आझाद मैदानाकडे जाणाऱ्या काही गावांतील युवकांना किराणा साहित्य पुरवून आंदोलनाला बळ दिले.

2. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडी कडे तक्रार – महागाई भत्ता आंदोलन: सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) देण्याचे आदेश दिले असतानाही, संचालकांनी (बोर्डीकर, वरपुडकर, गोरेगांवकर, माने, मुटकुळे, भरोसे आदिंनी) हा लाभ रोखला होता. आंदोलक गोविंद गिरी यांचे समर्थन करीत समीर दुधगांवकर यांनी कोणतेही संवैधानिक पद नसतांना नीतिमान नेतृत्व दाखवत प्रवर्तन संचालनालयाकडे (ED) तक्रार ऑगस्ट २०२२ मध्ये दाखल केली आणि या अन्यायाविरुद्ध आंदोलनाला ताकत दिली. यामुळे ५०० ते ७०० निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी व्याजासह २२ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळाले.

आरक्षणासाठी मंत्र्यांच्या मुलानेही पक्ष सोडला ;
थेट मोदी – फडणवीसांनाच भिडले |

a) प्रभाव: निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारले, तसेच पीडीसीसी बँकेच्या १,००० हून अधिक सध्याच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले, ज्यामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या परभणी आणि हिंगोली या दोन जिल्यातील शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या संस्थेच्या कार्यक्षमतेला चालना मिळाली.
3. वानर-मुक्त परभणी अभियान: समीर दुधगांवकर यांच्या नेतृत्वाखालील या अभूतपूर्व अभियानाने परभणी जिल्ह्यातील ८ गावांमधील शेकडो माकडांचे मानवीय पद्धतीने जंगलात स्थलांतर केले, ज्यामुळे मालमत्ता, पिकांचे नुकसान आणि यांच्या हल्ल्यात होणाऱ्या जखमांच्या समस्या यशस्वीपणे सोडवल्या गेल्या.

a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: या अभियानाने ८ गावांमध्ये (प्रति गाव सरासरी ५००-७०० घरे) शेकडो माकडांचे स्थलांतर करून दरवर्षी प्रति नागरिक २०,४०० ते १,२६,२५० रुपयांची बचत सुनिश्चित केली. यात छतांची बचत, पीक बचत आणि नागरिकांचे जखमांपासून बचत यांचा समावेश आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावले आणि शेती क्षेत्राला संरक्षण मिळाले.

4. स्वच्छ भारत अभियान, जानेवारी २०१८: समीर यांनी परभणी शहरासह विविध ठिकाणी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घेतला आणि महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये योगदान दिले. त्यांनी १९८० च्या दशकातील न्यूयॉर्क शहराच्या स्वच्छता आणि गुन्हेगारी कमी करण्याच्या यशोगाथेवर आधारित मॅल्कम ग्लॅडवेल यांच्या The Tipping Point: How Little Things Can Make a Big Difference या पुस्तकातील तत्त्वांचा उल्लेख केला. न्यूयॉर्क शहराने कचरा संकलन, रिसायकलिंग आणि कठोर कायदेशीर उपाययोजनांद्वारे “टिपिंग पॉइंट” तत्त्वांचा वापर करून स्वच्छता आणि सुरक्षिततेत क्रांतिकारी सुधारणा केल्या. या प्रेरणेचा उपयोग करत समीर यांनी परभणीतील स्वच्छता मोहिमांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. अश्या योजनांचा वापर न केल्याने मोदी सरकारचे हे चार लाख करोड रुपये खर्च झालेले अभियान असफल झाले आहे.

गावपातळीवरील जीवनमान उंचावण्यासाठीचे समीर यांचे खालील प्रकल्प आहेत.

संस्कृती रक्षण, पर्यावरण -

1. धारासूर, ता. गंगाखेड: गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समीर दुधगांवकर यांनी मा. पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची भेट घेतली. गावकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेताना, वर्षभरात निर्णय घडवून आणण्याचा शब्द दिला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून, २०२२ च्या अखेरीस मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यामार्फत २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, ज्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळाली.

a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: सांस्कृतिक अभिमान वाढवणे, स्थानिक पर्यटनात २० – ३०% वाढ, आणि १०००+ रहिवाशांसाठी १०-१५% अधिक व्यापार निर्मिती शक्यता..

2. अतिरिक्त होर्डिंग वापर कमी करण्यासाठी अग्रदूत (प्रस्तावित धोरण): समीर दुधगांवकर यांनी ३ ऑगस्ट २०२३ पासून शहर विद्रूप करणारी, पर्यावरणाला हानिकारक आणि अतिशयोक्तीपूर्ण बॅनरबाजी वरील खर्च कमी करून त्या निधीचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्याची दिशादर्शक मोहीम सुरू केली.

3. सामाजिक समरसता प्रकल्प: समीर यांनी अध्यात्मिक ज्ञानावर आधारित लोभ कमी करण्याच्या संकल्पनांचा पुरस्कार करीत सामाजिक समरसता प्रकल्पाच्या माध्यमातून निःस्वार्थी आणि सुखी समाज निर्मितीचा प्रयत्न सुरु केला आहे. विद्यार्थी, रहिवासी आणि तरुणांना सलोखा निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले.

a) या प्रकल्पाने सामाजिक एकता आणि परस्पर सहकार्याला चालना दिली आहे, ज्यामुळे परभणी आणि आसपासच्या भागात समुदायांमधील सौहार्द लवकरच वाढलेले दिसेल आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन मिळेल.

4. शिंदे दुधगांवकर जागतिक वक्तृत्व स्पर्धा:समीर दुधगांवकर यांनी सर्वोत्कृष्ट विचारधारा आणि चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २०२३ पासून सुरू केले. दर वर्षी या स्पर्धेसाठी २.२५ लाख रुपयांहून अधिक किमतीची बक्षिसे ठेवण्यात आली असून, स्पर्धा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केली जाते.

a) पहिल्या वर्षाचा विषय माजी मंत्री खासदार अँड. गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही राऊत) यांच्या नैतिक आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित तर दुसऱ्या वर्षासाठी श्रीमद् भगवद गीतेच्या एक श्लोकी गीता म्हणाल्या जाणाऱ्या १८:६६ या श्लोकाचा नेमका अर्थ काय हा विषय होता. “महिलांचे त्यांच्याच मुलाच्या विरोधात असणाऱ्या पुरुष-विरोधी कायद्यांबाबत मौन धारण करणे – योग्य की अयोग्य” हा तिसऱ्या वर्षी विषय आहे.

5.व्यसनमुक्त आणि निर्लोभी जीवनशैलीचा आदर्श: मंत्र्याचा मुलगा, गर्भश्रीमंत असूनही, समीर यांनी कधीही व्यसन केले नाही. युवकांसमोर निर्व्यसनी वागण्याचा उत्तम आदर्श घालून दिला आहे. हुंडा न घेता लग्न करून नवीन पीढीला एक उदाहरण घालून दिले.

a) हजारो लोकांसमोर, अनेक गावांमध्ये श्रीमद् भगवद् गीतेच्या अभ्यासावर प्रवचने देऊन नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले, ज्यामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळाली आहे.

शेतकरी उत्पन्न वाढ, सिंचन, संरक्षण:-

1.  जिंतूर तालुका जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था लि.: समीर दुधगांवकर यांनी संचालक म्हणून १९६० मध्ये स्थापित जिंतूर तालुका जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या माध्यमातून २०२१ पासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. २०२२ मध्ये तूर, मूग, हरभरा आणि उडीद यांसारख्या धान्यांसाठी नाफेड शासकीय खरेदी केंद्र म्हणून या संस्थेने जिल्ह्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या केंद्राचा मान मिळवला, विशेषतः चना खरेदीतील उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांक देण्याचे नियोजित झाले होते.

2. जिल्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा चळवळीत समीर यांचे सक्रीय नेतृत्व – २०२२ मध्ये ५२ मंडळांसाठी शेतकऱ्यांना ₹ ४१० कोटी मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केले. राजकीय आयुष्यातील अनेक वर्ष चाललेली हि एकमेव केस, ज्यातून २०२५ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली… (सध्यापर्यंत तरी एकच केस आहे…! 😉)

a) जिंतूर मधील दुधगांव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप, रबी हंगामातील पीक विम्यासाठी आंदोलने केली. ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किर्तन आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात पंचक्रोशीतील हजारो शेतकरी सहभागी. सोयाबीनचा थकलेला विमा मिळाला, काही दिवसांनी हरभऱ्याचाही विमा मिळाला.

3. राज्यभराच्या शेतकऱ्यांसाठी – जून २०२४ अर्थसंकल्पात सौर ऊर्जा कृषिपंप योजना: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी ११,००० कोटी रुपये खर्च होऊनही पुरेशा वीज पुरवठ्याचा अभाव असल्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी, महाराष्ट्र चेंबर संघटनेने (अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष समीर दुधगांवकर, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथ्रीकर यांनी) २०१५ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात सौर कृषीपंप योजनेची मान्यता मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अधिकाऱ्यांकडून कठोर अटी घालून ही योजना मर्यादित स्वरूपात लागू केली गेली. पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-मुक्त मराठवाडा झाला आणि धक्कादायक निकालानंतर सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनांसहित जून २०२४ मध्ये पूर्णपणे विस्तारित केले.

a. जरांगे पाटलांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनात समीर त्यांनी परभणी जिल्ह्यात सक्रिय नेतृत्व केले. उद्योजक तसेच मराठा आंदोलक नेतृत्व म्हणून या योजना मंजुरीमागील युवा नेते म्हणून समीर दुधगांवकर यांनी इतिहासात स्थान मिळविले.

b. ऑक्टोबर २०२५ पर्यंत राज्यात २,६३,१५६ सौर पंपांचे वाटप झाले असून, दररोज ९०० पंपांचे वितरण सुरू आहे. डिसेंबर २०२५ मध्ये आजतागायत आठ लाख शेतकऱ्यांना कृषिपंप कार्यान्वित होण्याचे नियोजित आहे. राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सन २०२८-२९ च्या अखेरपर्यंत पंप मिळतील. जे झाल्यानंतर ग्रोक एआय च्या मते राज्याला दरवर्षी ₹ ६९,३४२ कोटींचा निव्वळ आर्थिक लाभ होणार आहे.

c. ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५,९११ पंप वाटल्यामुळे गिनीज बूक मध्ये महाराष्ट्राचे नाव नोंदविले गेले आहे.

4. ४३ गाव समृद्धी समिती – ७० वर्षे जुना पाणी प्रश्न :- जून २००९ मध्ये मा. आमदार सुरेश वरपूडकरांनी, मंत्री अजित पवारांची मीटिंग घेवून प्रश्न सोडवण्याचे केवळ नाटक केल्याने प्रलंबितच राहिला होता. २०१८ मध्ये गावकऱ्यांच्या आग्रहास्तव या प्रश्नाच्या गांभीर्याला लक्षात घेऊन समीर यांनी परभणी, मानवत आणि पाथरी येथील “४३ गाव पाणी प्रश्न समिती” बनवून आंदोलन उभे केले, सगळ्या गावात मीटिंग घेतल्या. राज्य सरकारच्या मराठवाडा वॉटर ग्रिड मंजुरीमुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल या माहितीनंतर आंदोलनाची गरज उरली नव्हती.

a) पुढे, या गावांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचे रूपांतर “४३ गाव समृद्धी समिती”मध्ये झाले.

b) आमदार विटेकर यांनी हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये ही मागणी पुन्हा उपस्थित केली. आमदार विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्वेक्षणाचे जुलै २०२५ मध्ये आदेश.

5. मुळी बंधारा पुनर्रुजीवन, ता. गंगाखेड:

a) सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यातील २० ते २५ गावांना या बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ होतो. बंधाऱ्याचे वाहून गेलेले दरवाजे पुन्हा बसवावेत, अशी मागणी चार वर्षांपासून दुर्लक्षित होती. ऑगस्ट २०२० मध्ये या प्रश्नाचा पाठपुरावा केला, दरवाजे बसवण्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू होणार होती. कार्य पूर्ण झाले आहे असे संबंधित अधिकारी यांनी कळविले आहे.

6. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिक्षण सहाय्य (मे २०१९): मे २०१९ मध्ये, समीर यांनी टीम समीरचे प्रमुख म्हणून शेतकरी कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. सावरगाव (जिंतूर) येथील दोन मुली आणि खरबा गाव (मानवत तालुका) येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील दोन मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक आणि सामाजिक मदत देण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीच्या काळात शासनानेही अशाच प्रकारची सामाजिक जबाबदारी स्वीकारली आणि नागरिकांना तसे करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. या विचाराचे अग्रदूत समीर दुधगांवकर ठरतात..!!

उद्योजकता तसेच युवकांचे भविष्य निर्माण

1. सहकारी बँकांसाठी CGTMSE मध्ये समावेश: समीर दुधगांवकर यांच्या भाजपा उद्योग आघाडीच्या कार्यकाळा दरम्यान सहकारी बँकांना क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) मध्ये सामील होण्यासाठी आणि बिनतारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला गेला.

a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: यामुळे १०,००० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) १०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज सुलभ झाले, ज्यामुळे जीडीपीमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

b) दीर्घकालीन परिणाम: या समर्थनामुळे दरवर्षी ७५,००० ते २,००,००० तरुण आणि उद्योजकांना लाभ होऊ शकतो, यापैकी ५२,५०० ते १,६०,००० टियर-२ आणि त्यापेक्षा खालच्या शहरांतील व्यक्तींसाठी, १७,५०० कोटी ते ५२,५०० कोटी रुपयांच्या बिनतारण कर्जाद्वारे लाभ होणे अपेक्षित आहे. यामुळे १,०५,००० ते ८,००,००० रोजगार निर्माण होतील, त्यापैकी ५२,५०० ते ४,००,००० तरुणांसाठी असेल, परभणीसारख्या उपेक्षित क्षेत्रांमध्ये ६१,२५० कोटी ते १,८३,७५० कोटी रुपयांची जीडीपी वाढ होते. हे प्रयत्न स्वावलंबन आणि आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनाशी संरेखित असून, ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरत आहेत.

2. युवकांसाठी रोजगार, उद्योजगता संधी: समीर यांनी युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. २०२० पासून मॅजिक या मंचाला महाराष्ट्र चेंबर सोबत जोडून अद्ययावत माहिती, मार्गदर्शन राज्यस्तरावर मिळण्याची व्यवस्था केली. परभणी मध्ये वारंवार रोजगार मेळावे आयोजित केले जातात, ज्यामुळे गावपातळीवरील विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळतात.

a) वर्ल्ड बँक प्रकल्पांतर्गत संभाजीनगर, जालना तसेच देशभरातील विविध ठिकाणी दरवर्षी हजारो युवकांना नोकऱ्या लावण्याचे कार्य सुरू आहे.

b) संपर्कासाठी: देशभरातील रोजगार संधींसाठी डॉ. संतोष कोल्हे यांच्याशी संपर्क साधा: +९१९४ ०३८४ ६४१५.

3. बजेट आणि तरुणांच्या रोजगारावरील टीव्ही चर्चा (२०१५ पासून): २०१५ पासून बजेट आणि तरुणांच्या समस्यांवर विविध टीव्ही चर्चासत्रांमध्ये पॅनेलिस्ट म्हणून समीर यांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यात तरुणांच्या रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि आर्थिक धोरणांवर वैचारिक योगदान दिले.

a) ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे: या चर्चांमुळे परभणी जिल्ह्यातील लाखो तरुणांसह महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या हितासाठी धोरणांवर सकारात्मक प्रभाव पडला, तसेच प्रत्येक चर्चेत लाखो प्रेक्षकांना रोजगार संधी आणि सरकारी योजनांबाबत जागरूक आणि शिक्षित केले. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली.
b) हमाल पोस्ट ग्रड्यूएट – झी टीव्ही रोखठोक चर्चा कार्यक्रमातील सहभागाची लिंक

4. नोकऱ्या दुप्पट करणे आणि सामाजिक प्रभाव: “नोकरी नाही तर छोकरी नाही” ही प्रचलित म्हण लक्षात घेता, समीर दुधगांवकर यांनी ऑक्टोबर २०१७ पासून “नोकऱ्या दुप्पट करणे” ही क्रांतिकारी संकल्पना मांडली, ज्यामुळे २ करोड सरकारी आणि १० करोड खासगी क्षेत्रातील नोकऱ्या दुप्पट होऊ शकतात. विशेषतः सरकारी नोकऱ्यांमुळे विवाह बाजारात व्यक्तींची मागणी वाढते, कारण अशा नोकऱ्यांना स्थैर्य आणि प्रतिष्ठा आहे. जरी पर्याय दिला तरी या योजनेमुळे १ कोटी नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे योजना घोषित केल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात लाखो/करोडो तरुणांचे विवाह होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुखाकारकता वाढेल.

a) प्रस्तावित धोरण: सध्या कर्मचारी ९ तास काम करतात, परंतु तज्ञांच्या मते, अनेक कर्मचारी केवळ ५ तास प्रभावीपणे कार्य करतात. म्हणून, ५ तासांची ड्युटी अनिवार्य करून दुसऱ्या व्यक्तीला नोकरीची संधी देण्यासाठी असा कायदा बदल केला पाहिजे. यामुळे एकूण १० तासांचे कार्य अखंडित राहील, देशाच्या उत्पादकतेला चालना मिळेल आणि करोडो नवीन नोकऱ्या तात्काळ निर्माण होतील.

“जरी पर्याय दिला तरी या योजनेमुळे १ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात” हे मंत्री संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर संघटनेतर्फे हि मागणी मांडताना महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष –
एका शिफ्टमध्ये दोघांना रोजगार देता येईल असा कायदा बदल करा – महाराष्ट्र चेंबर अध्यक्षांची संघटनेतर्फे मागणी..!

b) उल्लेखनीय म्हणजे, उद्योग दिग्गजांसोबत कार्य करताना समीर यांनी पारंपरिक नऊ तासांच्या कामाच्या दिवसातील अकार्यक्षमतेची गोम शोधली — ही एक महत्त्वपूर्ण बाब जी अगदी अनुभवी उद्योग नेत्यांनाही दिसली नाही ती समीर यांना दिसली आणि यांच्या वैचारिक ताकत दर्शविते.

1. ग्रोकचे प्रभावाबाबत आकडे:जीडीपीमध्ये ₹5–10 लाख कोटींची भर आणि 50 दशलक्ष+ कुटुंबांना आधार देण्याची शक्यता. ही संकल्पना कार्य-जीवन संतुलनाला प्रोत्साहन देते आणि अर्थव्यवस्थेचे दरवर्षी ३०% नुकसान करणाऱ्या अकार्यक्षमतेवर प्रभावी उपाय ठरते. यामुळे लाखो तरुणांना विवाहाच्या संधी मिळतील, ज्यामुळे सामाजिक बंध मजबूत होतील, कौटुंबिक स्थैर्य वाढेल आणि ग्रामीण व शहरी भागांतील तरुणांचे जीवनमान उंचावेल. तसेच, या योजनेमुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळून, विशेषतः परभणीसारख्या उपेक्षित क्षेत्रांमध्ये सामाजिक आणि आर्थिक समृद्धी वाढेल.

या शासकीय पत्राद्वारे आणि समीर यांनी संकलित केलेल्या लिंकन यांच्या मार्गदर्शक विचारांतून लक्षात येते की पूर्णपणे समीरचे वैचारिक नेतृत्व लाभलेल्या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकता बदलासाठी उपयोग होतोय.
म्हणजेच नौकऱ्या दुप्पट करणे प्रकल्पाचा सुद्धा टीम समीरने सांगितलेला फायदा नक्कीच होऊ शकतो.

नागरिकांना प्रबळ आवाहन पृष्ठावर केलेल्या विनंतीवजा विचारांप्रमाणे जर साथ द्यायची तयारी असेल तसेच साथीदार कसे असावे हे संपर्क पृष्ठावर हिंदुस्तानचा वारसा जपण्याच्या संधीबाबत या पृष्ठावर मांडले आहे. या विचारांना धरून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या अभ्यासावर आधारित कर्जबाजारीपणा टाळत ज्या संकल्पनांवर कार्य होईल, अश्या मराठवाड्याचे कर्मवीर गणेशराव दुधगावकर परिवाराच्या संकल्पना –

अमेरिकेकडे दर एक दोन वर्षाला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतात, तसेच जगातील लोकशाहीने चालणाऱ्या सगळ्याच देशांच्या कर्जबाजारीपणातून झालेली पोलखोल पाहता खालील संकल्पना सुचविणारे एक प्रखर निर्लोभी नेतृत्व टीम समीर यांच्या मागे सगळे जण उभे राहतील हि आम्हाला खात्री आहे.

१२५+ वर्षांच्या आध्यात्मिक वारशात रुजलेले आणि अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित, समीर यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समरसतेतील प्रयत्न परभणीच्या १.८३ दशलक्ष हून जास्त रहिवाशांचे जीवन उंचावण्याची क्षमता राखतात. सन २००२ पासून श्रीमद-भगवद-गीता अभ्यासक, राज्य उद्योग नेतृत्व समीर यांना जर अधिक पाठबळ मिळाले, तर महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकसंख्येसाठी तसेच देशासाठी, छत्रपती शिवरायांच्या आणि दिल्ली दिग्विजयवीर महाराज महादजी शिंदे यांच्या स्वप्नातील शाश्वत विकास कसा असू शकतो याचे मॉडेल परभणी बनू शकते.

दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व समीर यांचे बाबत :-

समीर दुधगांवकर – संक्षिप्त माहिती

समीर यांचा विस्तृत प्रवास

राज्य, राष्ट्रीय पातळीवरील कार्य

समीर यांचे विशेष अभ्यास क्षेत्र, आवडी, महत्वाच्या प्रकल्प संकल्पना